राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू – आव्हाड


मुंबई – राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू, असा गंभीर इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हा इशारा राज्यात पाकिस्तानातील कांदा आयात केला जाणार असून त्या पार्श्वभूमीवर दिला आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वी राज्यात पाकिस्तानातील साखर आयात करण्यात आली होती. आम्ही त्यावेळी गोदामे फोडली होती. आता जर कांदा आला तर मार्केट जाळून टाकू, असा इशारा त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

एकीकडे पाकिस्तानचा वापर धर्म द्वेषाचे राजकारण करण्यासाठी करायचे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे हित जपण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त केले जात असेल तर हे खपवून घेणार नाही. येथे पाकिस्तानचा वापर धर्मद्वेषाचे राजकारण करण्यासाठी करायचा आणि येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारून टाकण्यासाठी पाकिस्तानातून कांदा आणायचा. मागे साखर आणली होती तर गोदाम फोडले. आता कांदा आणला तर मार्केट जाळून टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाकिस्तानातून येणार्‍या कांद्याचे राजकारण आव्हाड यांच्या ट्विटमुळे राज्यात पेटण्याची शक्यता आहे. तसेच विविध संघटना आणि राजकीय पक्षही यासाठी पाकिस्तानच्या कांदा विरोधात उभे राहण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानातून होत असलेल्या कांदा आयातीवर ट्विट करून प्रदेश काँग्रेसनेही जोरदार टीका केली आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेले ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानला इतरवेळी शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा, हा भाजपचा दुतोंडीपणा आहे. कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील, परंतु भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त आहे.

Leave a Comment