पाकिस्तान आणि इम्रान खान यांनी यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा – आठवले


नवी दिल्ली – पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजप-आरएसएसच्या नेत्यांपाठोपाठ आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून पाकिस्ताने तो अवैधरित्या गिळंकृत केला आहे. स्वतःच्या हिताची जर पाकिस्तान आणि इम्रान खान यांना चिंता असेल तर, पाकव्याप्त काश्मीर भारताला त्यांनी सोपवावा, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते चंदीगडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पाकिस्तान सरकारवर पाकव्याप्त काश्मीरमधील लोक नाराज असून पाकिस्तानसोबत राहण्याची त्यांची इच्छा नसून त्यांना भारतात येण्याची इच्छा आहे. याबाबतची माहिती वारंवार मिळत आहे. पाकिस्तानने ७० वर्षांपासून भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरच्या एक तृतीयांश (1/3) प्रदेशावर अनाधिकृतरित्या कब्जा केला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानला जर युद्ध नको हवे असेल त्याचबरोबर त्यांना त्यांच्या भल्याची चिंता असेल तर, पाकव्याप्त काश्मीर त्यांनी आम्हाला सोपवावा. इम्रान खान यांना खरोखरच पाकिस्तानच्या हिताची चिंता असेल आणि त्यांना युद्ध नको असेल तर, त्यांनी भारताला पाकव्याप्त काश्मीर सोपवणेच त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरेल, असा सज्जड दम आठवले यांनी पाकिस्तानला भरला आहे.

Leave a Comment