बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या स्टार प्लसवरील नच बलिये 9 कार्यक्रमात प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. रवीना सध्या सरकारच्या एका निर्णयाचा विरोध केल्याने चर्चेत आहे. तिने सरकारच्या एका निर्णयाचा विरोध करणारे ट्विट केले आहे. बिहार सरकारच्या एका निर्णयाचा विरोध करत रवीनाने ट्विट केले की, यांनी केलेल्या कर्माचा दंड नक्की मिळेल. रवीनाचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलचे व्हायरल झाले आहे.
बिहारमधील शेतकऱ्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार सरकारकडे केली होती. यावर सरकारने राज्यातील जवळपास 300 नीलगायींना मारण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यातील एक नीलगाय गोळी लागल्यानंतरही न मेल्याने तिला जिंवत गाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
Heartless inhumane b………. whoever behind this decision. hope karma gets back doublefold. https://t.co/HRkLU9nK0F
— Raveena Tandon (@TandonRaveena) September 7, 2019
या घटनेवर भडकलेल्या रवीनाने ट्विट केले की, ह्रदयहीन मानव… जे कोणी या निर्णयाच्या मागे आहे, त्याला त्याच्या कर्माची फळं नक्की मिळतील.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.