भारताच्या चांद्रयान मोहिमेची पाक अभिनेत्रीने उडवली खिल्ली


श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ जुलै रोजी झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. पण काही तांत्रिक कारणामुळे केवळ २ किलोमीटरवर विक्रम लँडरचा संपर्क तुटला. वैज्ञानिकांचा हा महत्वाकांक्षी प्रयोग थोडक्यासाठी अपयशी ठरल्यामुळे भारतीयांचा काहीसा हिरमोड झाला. पण इस्रोच्या या प्रयत्नाचे संपूर्ण जगाने कौतुक केले. पण भारताच्या चांद्रयान मोहिमेची पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलिक हिने खिल्ली उडवली आहे.


एका मागून एक असे सलग तीन ट्विट करत विणा मलिक हिने भारतीय वैज्ञानिकांची खिल्ली उडवली आहे. यातील एक ट्विटमध्ये तर तिने चक्क चांद्रयान मोहिमेऐवजी भारताने शौचालयेच बांधावीत, अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेनंतर भारतीय नेटकऱ्यांनीही तिला चांगलेच झापले आहे.

Leave a Comment