कसोटी मालिकेतही वेस्टइंडिजला व्हाईटवॉश


किंगस्टन – दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडिजच्या संघावर तब्बल 256 धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकाही खिशात घातली आहे. गोलंदाजांची दुसऱ्या सामन्यात कामगिरी महत्त्वपुर्ण ठरली असून रविंद्र जडेजा व मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर इशांत शर्माने व बुमराहने 1 गडी बाद केला.

हनुमा विहारीच्या कारकिर्दीतील पहिल्या शतकामुळे आणि बुमराहच्या हॅट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांमध्ये गुंडाळल्यामुळे 299 धावांची आघाडी भारताने मिळवली. त्यानंतर 168 धावांवर 4 गडी बाद असताना भारताने डाव घोषित केला. इंडिजला आता 467 धावा पार करणे गरजेचे होते. पण 210 धावांतच भारताने वेस्ट इंडिजला धूळ चारली आणि तब्बल 257 धावांनी भारताने विजय मिळवला आणि 2-0 ने मालिकाही खिशात घातली.

Leave a Comment