मालगाडीच्या खाली प्रेमी युगल निवांत गप्पा मारत बसल्याचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा फोटो व्हायरल झाल्यावर रेल्वे मंत्रालयाने देखील ट्विट करत हे धोकादायक असल्याचे म्हटले. रेल्वे मंत्रालयाने केलेल्या या ट्विटनंतर मंत्रालयाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.
This is Dangerous and a punishable offence ! Please never try to reach under any stationary wagon or coach. It may move without giving any warning. Cross Railway track only from authorised locations. STAY ALERT STAY SAFE !!! pic.twitter.com/vqRkjhMqJW
— Ministry of Railways (@RailMinIndia) August 27, 2019
रेल्वे मंत्रालयाने फोटो शेअर करत लिहिले की, हे धोकादायक आणि दंडात्मक गुन्हा आहे. कृपया उभ्या असलेल्या डब्ब्याच्या किंवा कोचच्या खाली बसू नये. ही गाडी कधीही वॉर्निंग न देता सुरू होऊ शकते. रेल्वे ट्रॅक कधीही सुरक्षित जाग्यावरूनच क्रॉस करावा. सुरक्षित रहा.
मंत्रालयाने हे ट्विट करताच त्यांना ट्रोल करण्यात आले. अनेक युजर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या.
अब क्या मोदी राज मे लोग इश्क़ भी नही लडा सकते।
गार्डन मे बैठो तो पुलिस का डर,
प्लेटफॉर्म पे रिश्तेदारो का डर,
पटरी पे आप नही बैठने दे रहे,आखिर युवा करे, तो क्या करें।
बताईये मोदीजी , जवाब देना होगा, देश के युवा का सवाल है।😉😂🤣😂😉#AbkiBaarMandiSarkaar #YOUTH
— The रायचंद (@v_ashutosh) August 27, 2019
एका युजरने लिहिले की, आता मोदी सरकारच्या काळात लोक प्रेम देखील करू शकत नाही का ?
sir इनको प्रधानमंत्री आवास योजना से घर दिलवा दिया जाये। मेरा विनम्र निवेदन है। अगर बिहार से है तो CSC के किसी सेन्टर से ये संपर्क करे
— Pritam (@digigraphicsmuz) August 27, 2019
तर दुसऱ्या युजरने लिहिले की, माझी रेल्वे मंत्रालयाला विनंती आहे की, यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एक घर द्यावे. बिहारचे असतील तर सीएससीच्या सेंटरवर कॉल करावा.