पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 318 धावांनी विजय


अँटिग्वा- भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर इंडिज संघ 100 धावातच गारद झाला. भारतीय स्टार गोलंदाज जसप्रित बुमराहने 5 गडी बाद करत उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. तर त्याला इंशात शर्माने 3 आणि मोहम्मद शमी यांने 2 गडी बाद करत उत्तम साथ दिली.

चौथ्या दिवशी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज समोर 419 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले होते. इंडिजच्या फलंदाजांनी या लक्षाचा पाठलाग करताना अंत्यत निराशाजनक सुरुवात केली. अवघ्या 15 धावांत इंडिजने 5 खेळाडू गमावले होते. त्यांतर आलेल्या फलंदाजांनाही चांगली खेळी करता आली नाही. केमार रोच आणि कमीन्स यांनी दहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली. पण त्यांची खेळी व्यर्थ ठरली. इंडिज संघ अवघ्या 100 धावात सर्वबाद झाला. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Leave a Comment