पेटीएमने एवढ्या कोटींमध्ये मिळवला टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकाचा मान


मुंबई – टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकाची निवड भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली असून टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकासाठी वन-97 कम्युनिकेशन्स प्राइवेट लिमिटेडची मालकी असलेल्या पेटीएमला निवडले गेले आहे.

पेटीएम संदर्भात नुकतीच बीसीसीआयने घोषणा केली. ३२६.८० कोटी रुपयांची बोली लावून पेटीएमने मुख्य प्रायोजकाचा मान पटकावला. आता टीम इंडियाबरोबर चार वर्षांसाठी पेटीएम करारबद्ध झाले असून या कराराबद्दलची माहिती बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी दिली आहे.

या करारबद्दल सांगताना जोहरी म्हणाले, मला सांगताना आनंद वाटतो आहे की, येथील मालिकेसाठी पेटीएम मुख्य प्रायोजक असणार आहे. पेटीएम भारताच्या नवीन पिढीतील कंपनीपैकी एक आहे. आम्हाला गर्व होत आहे की, पेटीएम टीम इंडियासोबत आपला करार कायम राखणार आहे. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर वर्मा म्हणाले, बीसीसीआय आणि टीम इंडियासोबतच्या भागीदारीमुळे आम्ही खुष आहोत.

Leave a Comment