पाकने केलेला भारताचे फायटर जेट पाडल्याचा दावा खोटा


नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाच्या अधिकारी मींटी अग्रवाल यांनी पाकिस्तानचा भारताचे सुखोई-30 फायटर जेट पाडल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने बालाकोट एअर स्ट्राईकनंतर 26 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत आपली एफ-16 फायटर विमाने घुसवली होती. भारताचे फायटर विमान यावेळी पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण, पाकिस्तानचा हा दावा मींटी यांनी खोडून काढला आहे.

बालाकोट एअर स्ट्राईक आणि त्यांनतर पाकिस्तानने केलेल्या पलटवारावेळी दाखवलेल्या शौर्याबद्दल मींटी अग्रवाल यांना ‘युद्ध सेवा पदक’ देण्यात आले आहे. मींटी या ‘युद्ध सेवा पदक’ मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे भारताने एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर पाकिस्तानने पलटवार म्हणून 27 फेब्रुवारीला आपली फायटर विमाने भारतीय हद्दीत घुसवली होती. यावेळी झालेल्या डॉगफाईटमध्ये मींटी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

विशेष म्हणजे मिंटी यांनी डॉगफाईटवेळी ‘वीर चक्र’ प्राप्त अभिनंदन यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले होते. अभिनंदन पाकिस्तान हद्दीत प्रवेश करण्याअगोदरपर्यंत त्यांचा अभिनंदन यांच्याशी संपर्क होता. युद्ध काळात विशेष कामगिरी बजावल्या बद्दल मिंटी यांनी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Leave a Comment