विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी


नवी दिल्लीः आपल्यापैकी जर कोणी विमानाने प्रवास करत असेल तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर सैरभैर झाले असल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. देशातील सर्वच विमानतळांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, सतर्कतेचा इशारा गुप्तचर यंत्रणांनीही दिलेला आहे.

आपल्या विधानात नागरी उड्डयन सुरक्षा ब्यूरोने (BCAS) म्हटले आहे की, घरगुती उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्यास विमान कंपन्या आणि विमानतळावरील प्रशासनानेही सांगितले आहे. तसेच 4 तास आधीच विमानतळावर येण्यास परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना सांगण्यात आले आहे. विमानतळावर येणारे ड्रोन मॉडल आणि मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर नजर ठेवली जाणार आहे, क्विक रिऍक्शन टीम यासाठी तैनात करण्यात आली आहे. हे निर्बंध 30 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. ही सुरक्षा स्वातंत्र्याच्या दिवसानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून वाढवण्यात आल्याचीही माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. 10 ऑगस्टपासून 30 ऑगस्टपर्यंत हा नवा नियम लागू राहणार आहे.

Leave a Comment