सुषमांचे निधन माझी वैयक्तिक हानी- मोदी


माजी परराष्टमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोडदी यांनी ट्विट करताना सुषमा यांचे निधन ही त्यांची वैयक्तिक हानी असल्याचे म्हटले आहे. मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना राजकारणातील एक गौरवशाली अध्याय समाप्त झाला. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. त्या उत्तम वक्त्या, कुशल राजकारणी आणि चांगल्या सहकारी होत्या असे म्हटले आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक सुषमा यांनी तब्येत बरी नसल्याने लढविली नव्हती मात्र त्या त्यांच्या विदिशा लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या होत्या. सुषमा यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांना मधुमेह होता.

Leave a Comment