भाजप खासदाराची नरेंद्र मोदींना भारतरत्न देण्याची मागणी


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची देशभरात चर्चा सुरु असताना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष असून त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी भाजपचे खासदार गुमान सिंह डामोर यांनीकेली आहे. मोदींनी काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेऊन कोट्यवधी भारतीयांचा आनंद द्विगुणीत केला आहे, मोदींना त्यासाठी भारतरत्न पुरस्कार दिला जावा असे डोमार म्हणाले. डोमर यांनी ही संसदेत शून्य प्रहारादरम्यान मागणी केली.

लोकसभेत शून्य प्रहारादरम्यान जम्मू-काश्मीरमधून घटनेतील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे मध्य प्रदेशच्या रतलाम येथील भाजप खासदार गुमान सिंह डामोर यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना, मोदी युगपुरूष असून, मोदींना जगातील अन्य अनेक देशांनी पुरस्कार दिले आहेत. कोट्यावधी भारतीयांचा आनंद त्यांनी द्विगुणीत केला आहे. त्यांना यासाठी भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Comment