या कारणामुळे सोनाक्षी सिन्हाला मागावी लागली माफी


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा एका वादामध्ये अडकली आहे. एका मुलाखतीमध्ये भंगी शब्दाचा वापर केल्याने ती वादामध्ये अडकली आहे. वाल्मिकी समाजाने तिच्या विरोधात उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रदर्शन केल्यानंतर अखेर तिने माफी मागितली आहे.

सोनाक्षीने ट्विट करत लिहिले की, ’23 जुलै 2019 ला सिद्धार्थ कनन बरोबरील मुलाखतीबद्दल मी सांगू इच्छिते की, मला वाल्मिकी समाजाप्रती पुर्ण आदर असून, समाज तसेच देशाच्या स्वातंत्र्यामधील त्यांच्या योगदानावर मला गर्व आहे.

https://twitter.com/sonakshisinha/status/1158096980616372228

तिने लिहिले की, जर माझ्या नकळत बोलण्याने कोणत्याही व्यक्ती, समाज अथवा समूहाला कोणत्याही प्रकारची ठेस पोहचली असेल तर मी माफी मागते आणि मी सांगू इच्छिते की, माझा असा कोणताही उद्देश नव्हता.’

आरजे सिध्दार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला एअरपोर्ट लूकबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली होती की, ‘असे थोडीच आहे की, घरी जाऊन भंगी बनून तयार होऊन येईल.’ सोनाक्षीच्या याच विधानावर वाल्मिकी समाजाने तिच्या विरोधात निदर्शने केली होती.

तसेच, याआधी अभिनेता आयुष्मान खुराणाने देखील त्याचा चित्रपट आर्टिकल 15 च्या निमित्ताने #DontSayBhangi असे  कॅम्पेन चालवले होते.

Leave a Comment