एक ट्विट शेअर करत आपण पती साहिल संघीपासून विभक्त होत असल्याचे काही दिवसांपूर्वीच दिया मिर्झाने सांगितलं होतं. यानंतर दोघांनी ११ वर्षांच्या नात्यानंतर अचानक विभक्त होण्याचा निर्णय का घेतला याबद्दल चर्चा सुरू झाल्या आणि हे सर्व काही एका तिसऱ्या महिलेच्या येण्याने घडल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले. आता यावर दिया मिर्झाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
1) This is to clarify and put to rest all kind of speculation that is being bandied about by a certain section of the media regarding my separation with Sahil. It is most unfortunate to see the level of irresponsibility exercised.
— Dia Mirza (@deespeak) August 2, 2019
दियाने या बातम्यांमध्ये काहीही सत्यता नसून हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे सांगत कोणीही तिसरी व्यक्ती आमच्या विभक्त होण्याचे कारण नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. याबाबत इतर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दिया पाठोपाठ ‘जजमेंटल है क्या’ची लेखिका कनिका धिल्लोनेही पतीपासून वेगळे होत असल्याचे सांगितल्यामुळे या दोन गोष्टींचा संबंध जोडला जाऊ लागला. कनिकानेही आता ट्विट करत या दोन्ही घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. मुळात मी दिया किंवा साहिलला आतापर्यंत आयुष्यात एकदाही भेटली नसल्याचे तिने म्हटले आहे.
2) What is even more unfortunate is that our colleagues names are being tarnished and maligned by this media. As a woman I will not stand for another woman’s name being used so irresponsibly to perpetuate a lie.
— Dia Mirza (@deespeak) August 2, 2019
3)There is absolutely no truth to the alleged reports and no third person is the reason for Sahil and I to part ways. We have requested the media to be graceful and allow us this time for some privacy. Really hope they can respect that.
— Dia Mirza (@deespeak) August 2, 2019
तर कनिकाला पाठिंबा देत, दियानेही एका महिलेच्या नात्याने मी दुसऱ्या महिलेसाठी उभा राहत आहे, कारण खोटी बातमी बनवण्यासाठी एका महिलेच्या नावाचा वापर करणे हा गैरजबाबदारपणा असल्याचे दियाने म्हटले आहे. तिने यासोबतच माध्यमांना पुन्हा एकदा विनंती केली आहे, की सध्या आम्हाला एकांताची गरज आहे. आशा करते, की तुम्ही या विनंतीचा मान राखाल.