रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार देशातील ‘ही’ १० ऐतिहासिक वारसास्थळे


नवी दिल्ली – केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रह्लाद पटेल यांनी देशातील १० ऐतिहासिक वारसास्थळांची सर्वसामान्यांसाठी सुरू राहण्याची वेळ 3 तासाने वाढवण्यात आल्याची माहिती दिली आहे. 10 ऐतिहासिक वारसास्थळे सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीमधील हुमायूनची कबर, सफदरगंज मकबरा, भुवनेश्वरमधील राजा राणी मंदिर, खजुराहो येथील दुल्हादेव मंदिर, कुरुक्षेत्रातील शेख चिल्लीचा मकबरा, कर्नाटकातील पट्टडकल स्मारकर समूह, गोल गुमबाज, महाराष्ट्रातील गडचिरोलीमधील मार्कण्डेय मंदिरांचा समूह, उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील मान महल, गुजरातमधील राणीचा वाव यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान तीन वर्षांच्या कालावधीसाठी वेळेतील हा बदल असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऐतिहासिक वारसास्थळांची खुली राहण्याची वेळ यापुर्वी सांयकाळी 6 वाजेपर्यंत होती.

युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत भारतातील काही ऐतिहासिक स्थळे आहेत. दरवर्षी १८ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. जगातील २८ स्थळांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले असून यात महाराष्ट्रातील पाच स्थळांचा समावेश आहे.

Leave a Comment