देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली रिलायन्स जिओ


नवी दिल्ली – तीन वर्षातच सर्वात मोठी दूरसंचार कंपनी होण्यात रिलायन्स जिओने यश मिळविले आहे. देशात जिओचे ३३.१३ कोटी ग्राहक झाले आहेत. तर जूनपासून व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या आर्थिक अहवालात जूनपर्यंत ३३.१३ कोटी ग्राहक असल्याची माहिती दिली. भारती एअरटेलला मुकेश अंबांनी यांची मालकी असलेल्या जिओने मे महिन्यात मागे टाकले आहे. त्यानंतर जिओ दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी झाली. जिओचा दूरसंचार बाजारपेठेमध्ये २७.८० हिस्सा होता. तर एअरटेलचा २७.६ टक्के हिसा होता.

एकीकडे जिओच्या ग्राहकांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे व्होडाफोन-आयडिया ग्राहकांची संख्या ३३४.१ दशलक्षावरून ३२० दशलक्ष एवढी झाली आहे. व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युअलर या परस्पर स्पर्धक कंपन्यांनी रिलायन्सच्या स्पर्धेला आव्हान देण्यासाठी विलिनीकरण केले होते. व्होडाफोन आयडिया ही त्यानंतर ४० कोटी ग्राहक असलेली देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी झाली होती. तरीही जिओचा दूरसंचार बाजारपेठेतील हिस्सा वाढत गेला. तर व्होडाफोन आयडियाचे ग्राहक प्रत्येक महिन्याला कमी होत आहेत. कमीत कमी रिचार्ज न केल्याने व्होडाफोन आयडिकाकडून ग्राहकांना मेसेज पाठविण्यात येत आहेत.

Leave a Comment