कपिल देवच निवडणार टीम इंडियाचा नवा गुरुजी


नवी दिल्ली – आता भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाबद्दलच्या सर्व चर्चांना पुर्णविराम मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक कपिल देव आणि त्यांची समिती ठरवणार असून स्वातंत्र्यदिनापूर्वी ही नियुक्ती होणार आहे

भारताच्या महिला संघाच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचा कपिल देव यांच्या समितीत समावेश आहे. हा निर्णय बीसीसीआयच्या (सीओए) बैठकीत घेण्यात आला आहे. प्रशिक्षकपदासाठीच्या मुलाखती ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे.

या नियुक्तीबाबत सीओएचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मुलाखती १३ किंवा १४ ऑगस्टला घेण्यात येणार आहेत. विराटचे कोणतेही योगदान या नियुक्तीमध्ये नसेल. विश्वचषक स्पर्धेत झालेल्या कामगिरीबाबत कोणतेही समीक्षण होणार नाही. प्रशिक्षकपद आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून आहे.

सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडेच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहणार आहे. वेळापत्रकानुसार 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी विराटलाच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

Leave a Comment