पूरग्रस्तांच्या मदतीला धावले बिग बी


आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये सध्या पुराने माजवला असून अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. आसाममध्ये आलेल्या पुराचा परिणाम तेथील नागरिकांवर आणि प्राण्यांवर होत आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बिग बी धावून आले आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमिताभ यांनी ५१ लाख रूपयांचा निधी दिला आहे. याबद्दलची माहिती देत अमिताभ यांचे आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आभार मानले आहेत. आसामच्या जनतेच्या वत्तीने तुमच्या सहकार्यासाठी आभार मानतो, असे सोनोवाल यांनी म्हटले आहे.


अमिताभ यांनी सोनोवाल यांचे हेच ट्विट रिट्विट करत म्हटले, की सध्या आसाम संकटात आहे. येथे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपल्या भावा-बहिणींची सुरक्षा करा. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे मदत करा. मी आताच केली. तुम्ही केली का? असे बिग बींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान याआधी अक्षय कुमारनेही आसाममधील पुरग्रस्तांसाठी आणि काझीरंगा अभयारण्यासाठी प्रत्येकी एक-एक कोटी रूपये दिले होते.

Leave a Comment