माहिती अधिकार; मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार अण्णा हजारे


अहमदनगर – नरेंद्र मोदी सरकारने संसदेत माहिती अधिकार कायदा कमजोर करण्यासाठी विधेयक मांडून कायद्यात बदल केला असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. जनतेचे अधिकार कायद्यातील बदलामुळे कमी होण्याचा धोका असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या संदर्भात पत्र पाठविणार असल्याचे हजारे म्हणाले.

सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी कायद्यातील कलम ४ मध्ये इंटरनेटवर टाकावी, असे बंधन आहे. पण १४ वर्षे कायदा तयार होऊन झाली तरी कलम ४ ची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी कायद्यामध्ये आपल्या फायद्यासाठी बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारचा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक आहे. असे ते म्हणाले.

Leave a Comment