साध्वी प्रज्ञा यांना भाजप नेतृत्वाने फटकारले


नवी दिल्ली – पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच खासदार झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अडचणीत आल्या आहेत. दिग्गज काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना पराभवाचा त्यांनी धक्का दिला होता. त्यांनी ‘सोहोर येथे झालेल्या एका कार्यक्रमात चक्क आपण खासदार गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी झाले नसल्याचे म्हटले होते.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. तसेच, अशी बेताल वक्तव्ये न करण्याविषयी ठाकूर यांना इशारा देण्यात आला आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद न साधणेच ठाकूर आणि नड्डा यांनी पसंत केले. पण, ‘पक्षाला अडचणीत आणणारी बेताल वक्तव्ये करू नका,’ असा इशारा प्रज्ञा यांना मिळाल्याचे सूत्रांकडून समजते.

Leave a Comment