निवड समितीने कधीही रायुडूसोबत पक्षपातीपणा केला नाही – प्रसाद


मुंबई – सलामीवीर शिखर धवनला विश्वचषक स्पर्धेत दुखापत झाल्याने स्पर्धेतून तो बाहेर पडला. अंबाती रायुडूला तेव्हा संघात संधी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अंबाती ऐवजी ऋषभ पंतला निवड समितीने पसंती दिली. अंबातीने तेव्हा तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर निवड समितीवर अनेकांनी संताप व्यक्त केला. विश्वचषक संपल्यानंतर यावर आता निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी भाष्य केले.

प्रसाद म्हणाले की, एखाद्या खेळाडूची जेव्हा संघात निवड होते. तो खेळाडू चांगली कामगिरी करतो. तेव्हा आम्हाला आनंद होतो. तसेच जेव्हा एखाद्या खेळाडूची निवड आम्ही संघात करू शकत नाही, आम्हालाही तेव्हा वाईट वाटते. रायुडूबाबत आम्ही कधीही पक्षपातीपणा केला नाही.

रायुडूच्या टी-२० च्या कामगिरीवरून आम्ही त्याला संघात स्थान दिले. निवड समितीवर तेव्हा टीका झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला. रायुडूची यो-यो टेस्ट तेव्हा झाली. या टेस्टमध्ये तो नापास झाला. त्यावेळी आम्ही त्याच्यासाठी एक महिन्याचा खास फिटनेस कार्यक्रम बनवला होता, असा दावा प्रसाद यांनी केला.

Leave a Comment