विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’


मुंबई- शिवसेनेने नुकतीच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जनते समोर जाण्यासाठी ‘महाजनादेश यात्रा’ काढणार आहेत. रविवारी गोरेगाव येथे भाजपच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीत यासाठीची घोषणा करण्यात आली.

ही यात्रा १ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मोझरी या गावातून निघणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून काढण्यात येत असलेली ही यात्रा २५ दिवस चालणार असून या यात्रेचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत.

ही यात्रा राज्यातील ३० जिल्ह्यात जाणार असून या यात्रेचा सुमारे ४ हजार ५०० किमीचा प्रवास असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीनशेहून अधिक सभा घेणार असून राज्यातील मतदारसंघात या सभाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन याच निर्धाराने राज्यात मुख्यमंत्री या यात्रेत जनतेपर्यंत पोहचणार आहेत, या यात्रेला जनाधार मिळणार आहे, लोकांना विकास आणि विश्वास आहे देण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे.

राज्यातील १५२ विधानसभा क्षेत्र या यात्रेत कव्हर करण्याचा प्रयत्न असल्याने मोठ्या, या दरम्यान १०४ जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री या यात्रेचे नियोजन करत असून त्याचा मार्गही ठरला आहे. यात ते २५ दिवस यात्रा करणार आहेत. ज्या गावात ही यात्रा पोहचेल त्या गावात कोणत्याही कार्यकर्त्याने मंदिरात अथवा इतर कोणत्या ठिकाणी येण्यासाठी, आग्रह करू नये, पुष्पहार घालण्यासाठी कोणी आग्रह करू नये. अशा सूचना या यात्रेचे प्रमुख सुरजीत सिंह ठाकुर यांनी सांगितले. यात्रेच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहेत. ही यात्रा पहिल्या टप्प्यात मोझरी ते नंदुरबार आणि दुसऱ्या टप्प्यात अकोले, अहमदनगर आणि समारोप हा नाशिक येथे होणार आहे.

Leave a Comment