‘त्या’ शब्दावरील बंदीची याचिका न्यायालयाने फेटाळली


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने अलिबागवरून आलास का?’, या डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. शुक्रवारी हा निर्णय मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने दिला.

अलिबागमधील सातीर्जे गावचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी अ‍ॅड. रघुराज देशपांडे यांच्यामार्फत ‘अलिबागहून आला आहेस का?’ किंवा ‘अलिबाग से आया है क्या?’ हे संवाद अपमानजनक असल्याच्या भावनेपोटी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

‘अलिबाग से आया क्या?’ या संवादातून सिनेमा, नाटके, टीव्ही मालिका, सार्वजनिक सादरीकरणे, स्टँडअप कॉमेडी, टिक टॉक, सोशल मीडियावर अलिबागची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे अलिबागकरांच्या भावना दुखावल्या जात होत्या. अलिबागकरांनी याविरोधात अनेक वेळा आवाजही उठविला होता. पण हा डॉयलॉग तरीही बोलला जात होता.

‘अलिबाग से आया क्या?’ या संवादावर बंदी आणण्यासाठी अलिबागचे रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. विनोद हे सर्व समुदायाच्या लोकांवर होतच असतात. ते फारसे मनावर घ्यायचे नसतात, असे नमूद करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Leave a Comment