माझ्या हक्काचा 1 रुपया मी दिल्लीला जाऊन घेणार : हरिश साळवे


लंडन : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी भारताच्या बाजूने निकाल दिला. 15 विरुद्ध 1 अशा मताने न्यायमूर्तींनी निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी या निर्णयाविरोधात मत दिले. आयसीजेने पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट केले. दिग्गज वकील हरिश साळवे यांच्याकडे भारतासाठी हा सर्वात मोठा खटला लढवण्याची जबाबदारी होती. हरिश साळवे यांनी हा आपला मोठा विजय असल्याचे सांगत आयसीजेच्या निर्णयाचे स्वागत केले आणि निष्पक्ष पद्धतीने पाकिस्तानकडून न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

या खटल्यासाठी फक्त एक रुपया देशातील सर्वात महागडे वकील म्हणून प्रसिद्ध असणारे हरिश साळवे यांनी घेतला होता. त्यांनी या खटल्यासाठी फक्त एक रुपया का घेतला याचे कारणही लंडनमध्ये एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तत्वांसाठी काही कामे करावी लागतात, पैसे तर अनेक मिळतात, असे ते म्हणाले. शिवाय यासाठी मला जो एक रुपया मिळणारा होता तो अद्याप मिळालेला नाही, मी तो दिल्लीत गेल्यावर घेईन, या संर्दभात सुषमा स्वराज यांच्याशी बोलणे देखील झाले असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

कोण आहेत हरिश साळवे?
सर्वोच्च न्यायालयातील साळवे वरिष्ठ वकील आहेत. देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी ते एक आहेत. एका दिवसाची त्यांची फी जवळजवळ 30 लाख रुपये असल्याचेही सांगितले जाते. पण त्यांनी कुलभूषण प्रकरणात केवळ 1 रुपया घेतला. ते 1999 से 2002 पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल देखील होते. त्यांचे वडील एन. के. पी. साळवे काँग्रेसचे माजी खासदार आणि क्रिकेट प्रशासकीय मंडळावर होते. हरिश साळवे यांनी भारताच्यावतीने नेदरलँडमधील हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) बाजू मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला.

Leave a Comment