पुन्हा डार्विनचा सिद्धांत खासदार सत्यपाल सिंह यांनी नाकारला


नवी दिल्ली : पुन्हा एकदा डार्विनचा सिद्धांत भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनी खोटा ठरवला आहे. सत्यपाल सिंह संसदेतील चर्चेत सहभागी होताना म्हणाले, हा निसर्गाची रचना मानवाने केली आहे. आपले पूर्वज ऋषी होते. आपले वंशज वानर होते अशी ज्यांची भावना आहे, त्या मला दुखवायच्या नाहीत.

विरोधकांनी संसदेत मानवाधिकार संरक्षण संशोधन विधेयक 2019 ला विरोध केला आहे. सत्यपाल सिंह यांनी त्याला उत्तर देताना हे उदाहरण दिले. ते म्हणाले, कधी मानवाधिकारावर भारतीय संस्कृतीत चर्चा झाली नाही, त्याऐवजी सदाचारी मानवाच्या चरित्राबाबतच्या चर्चेवर जोर देण्यात आला. आपल्याला वेदांमध्ये सदाचारी मानव बनण्याची शिकवण दिली आहे. आपली संस्कृती मानवतेची शिकवण देते.

सत्यपाल सिंह यांनी यावेळी संस्कृतमधील एक दाखलाही दिला. ते म्हणाले, धर्माची कसोटी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये गेल्याने पूर्ण होत नाही. आपण तसे धर्माच्या शिकवणीनुसार आचरण करायला हवे. मला जर त्रास होऊ नये असे वाटत असेल, तर दुसऱ्याला मी सुद्धा त्रास देऊ नये, ही धर्माची शिकवण आहे. दरम्यान, सत्यपाल सिंह यांनी यापूर्वीही डार्विनचा सिद्धांत खोडून काढला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ते चुकीचं असून, आपण वानराचे वंशज नाही, असं ते म्हणाले होते.

Leave a Comment