देशातील पहिलाच रोबोट मुंबई अग्निशमन दलात दाखल


मुंबई : अग्निशमन दलाला इमारतींमध्ये पसरणाऱ्या आगीची उष्णता आणि धूर यामुळे आग विझवताना मोठी अडचण येते. जवान या ठिकाणी आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जाऊ शकत नाही. पण आता मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आगीत थेट उडी मारून आगीवर नियंत्रण मिळवणारा अत्याधुनिक रोबो दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा देशातील पहिलाच रोबो आहे.

सुमारे १ कोटी रुपये एवढ्या या रोबोची किंमत आहे. सुमारे ४०० ते ५०० किलो प्रत्येक रोबोचे वजन आहे. रोबोतील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्ट चित्र दाखवेल. रोबो उष्ण तापमानात स्वत:चे संरक्षण करेल. बॅटरीवर रोबो चालणार असून पाण्याचे पाईप ओढणे, आग विझवणे असे अडथळे दूर करेल. ईस्त्रायल, चीन, अमेरिका असे रोबो सध्या तयार करते. त्याची निर्मिती विमान बांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम पत्र्याच्या सहाय्याने करण्यात आली आहे. हा ‘जवान’ ७०० अंश सेल्सिअसच्या तापमानातही काम करू शकणार आहे. फ्रान्सच्या कंपनीने तयार केलेला हा रोबो ५५ मीटर उंचीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतो. त्याचे ३०० मीटरपर्यंत रिमोटद्वारे नियंत्रण करणे शक्य आहे. यामध्ये कॅमेरा बसविण्यात आला असल्याने घटनास्थळाचाही अंदाज घेता येणार आहे.

उंचच उंच टोलेजंगी इमारती मुंबईत उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींना आग लागल्यावर मोठ्या प्रमाणावर पसरणारी आगीची उष्णता आणि धूर यामुळे अग्निशमन दलाला आग विझवताना मोठी अडचण येते. जवान या ठिकाणी आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जाऊ शकत नाहीत. पण आगीच्या ज्वाला, धुराचे लोळ, चिंचोळय़ा गल्ल्या, बेसमेंटची आग अशा ठिकाणी अग्निशमन दलात दाखल होणारा हा रोबो थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकणार आहे. या रोबोवर कॉम्प्युटरच्या माध्यमातून सूचना देऊन काम करून घेतले जाणार आहे. हा रोबो अडगळीच्या ठिकाणी जाऊन आग विझवू शकणार असल्यामुळे आग भडकण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

Leave a Comment