पुरग्रस्त राज्यांच्या मदतीसाठी धावून आला अक्षय कुमार


बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या सामाजिक कार्याबद्दल देखील अनेकदा चर्चेत असतो. तो अनेकदा गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावत त्यांना आर्थिक मदत करत असतो. अक्षयने आता पुन्हा एकदा पुरग्रस्तांची मदत करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये सध्या पुराने कहर केला आहे. अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. तर पाण्याखाली काझीरंगा अभयारण्याचा अर्धा भाग गेला आहे. ही परिस्थिती मन हेलावणारी आहे. आसाममध्ये आलेल्या पुराचा परिणाम तेथील नागरिकांवर आणि प्राण्यांवर होत आहे.


त्यांना या कठिण काळात मदतीची गरज आहे. कांझीरंगा पार्कसाठी १ तर आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी १ कोटी मी दान करत असल्याचे अक्षयने म्हटले. पुरग्रस्तांसाठी आणि कांझीरंगा नॅशनल पार्कच्या बचावासाठी तुम्ही सर्वांनीही दान करावे, असे आवाहन अक्षयने चाहत्यांना केले आहे. अनेकांनी अक्षयच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Leave a Comment