राजस्थानमधील १३१० शरणार्थी झाले भारतीय नागरिक


नवी दिल्ली – गृह राज्यमंत्री नित्यांनद राय यांनी राजस्थानमधील १३१० शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यातील ८२ जणांना राजस्थान सरकार, १११३ जणांना जोधपूरचे जिल्हाधिकारी, ७ जणांना जैसलमेर आणि १०८ जणांना जयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकत्व देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले आहे.

राजस्थानामधील जोधपूर, जैसलमेर आणि जयपूरसह १६ जिल्हे आणि ७ राज्यांमध्ये कायदेशीर प्रवाशांशी संबंधित पंजीकरण किंवा प्राकृतिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते, असे निर्देश केंद्र सरकारने दिले असल्याची माहिती राय यांनी एका लिखित उत्तरात दिली आहे.

पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून या राज्यांमध्ये येणाऱ्या ६ मुस्लिमेतर समुदायांना भारतीय नागरिकत्व बहाल करता येते. याअंतर्गत राजस्थान सरकारमध्ये जोधपूर, जयपूर आणि जैसलमेर या ३ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी १३१० अप्रवासींना भारताचे नागरिकत्व दिले असल्याचे राय यांनी सांगितले. लोकसभेत ९ जानेवारीला नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले होते. याअंतर्गत डिसेंबर २०१४ आधी बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या मुस्लिमेतरांना या विधेयकानुसार नागरिकत्व बहाल करता येते. मात्र, राज्यसभेत हे विधेयकाला विरोध करण्यात आला आहे.

Leave a Comment