विंडीज दौऱ्याचे नेतृत्व करणार रोहित शर्मा?


मुंबई – आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीतील या पराभवामुळे भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आले. टीम इंडियाचे आता पुढील लक्ष वेस्ट इंडिज असणार आहे. विंडीज दौऱ्यावर टीम इंडिया दोन कसोटी व प्रत्येकी तीन एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यापैकी एकदिवसीय आणि टी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात येणार आहे.

कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे रोहितकडे एकदिवसीय आणि टी-20 संघाचे नेतृत्व दिले जाणार आहे. तर कसोटीचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे दिले जाऊ शकते.

विंडीजविरुद्धच्या 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. सचिनचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या २६ धावा यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुफान फॉर्मात असलेल्या हिटमॅन रोहित शर्माला कमी पडल्यामुळे त्याला आता हा विक्रम गाठण्यासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment