साधासुधा असलेला राणादा आता वेगळ्या रूपात परत येणार


तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादाच्या जाण्याने संपूर्ण गाव थिजून गेले असून सरपंचपदाचा पाठकबाईंनी राजीनामा दिला. अजूनही पाठकबाई शॉकमध्येच आहे. आता दोन वर्षांनी पुढे तुझ्यात जीव रंगला मालिका जाणार असून सुरुवातीला साधासुधा असलेला राणादा आता परत येणार आहे. दरम्यान नंदिताची गावात दहशत आहे. नंदिता आणि पप्याच्या छळाला गाव कंटाळला आणि राणादा नंदिताला धडा शिकवायला येतो.

राजा राजगोंडा बनून राणा हा पुन्हा येतो. पण त्याचा आता पूर्ण मेकओव्हर झाला आहे. तो साऊथ इंडियन लूकमध्ये आहे. राजा बनून आलेला राणा हा गावाला नंदिताच्या जाचापासून वाचवणार. कारण आता तो बावळट राहिलेला नाही. तो बिनधास्त आणि डॅशिंग आहे. या आठवड्यात राणाचा हा मेकओव्हर पाहायला मिळणार आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेत तोचतोचपणा आला होता. त्यामुळे साउथचा हा तडका काय रंग भरतो आगामी काही दिवसातच कळेल.

Leave a Comment