सुमन रावने जिंकला ‘मिस इंडिया’ खिताब


यंदाच्या फेमिना ‘मिस इंडिया २०१९’ चा निकाल जाहिर करण्यात आला असून यंदाचा ‘मिस इंडिया’ खिताब राजस्थानच्या सुमन राव हिने जिंकला आहे. मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमवर मिस इंडियाचा ग्रँड फिनाले शनिवारी पार पडला.

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या सोहळ्यात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा करण जोहर, मनीष पॉल, माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांनी सांभाळली होती. तर यावेळी हुमा कुरैशी, चित्रागंदा सिंह, रेमो डिसूजा, आयुष शर्मा, मुकेश छाबरा, दिया मिर्झा आणि नेहा धुपियासह अनेक कलाकार उपस्थित होते.

३० सौंदर्यवतींनी मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात छत्तीसगडच्या शिवानी जाधवने दुसरे स्थान पटकावले. ती यावर्षी मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. बिहारच्या श्रेया रंजनने तिसऱ्या स्थानी बाजी मारली. ती मिस युनायटेड ब्युटी स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर, तेलंगणाच्या संजना विज ही देखील रनरअप ठरली. ७ डिसेंबरला होणाऱ्या ‘मिस वर्ल्ड २०१९’ मध्ये यंदाचा ‘मिस इंडिया’ किताब पटकावणारी सुमन राव ही भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Leave a Comment