खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणात सलमान खानला न्यायालयाकडून दिलासा


जोधपूर – अभिनेता सलमान खानला खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणात जोधपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या प्रकरणात निर्दोष ठरवण्यात आले आहे. सलमान खानने २००६ साली एक खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. सलमानने ज्यामध्ये त्याचा शस्त्र बाळगण्याचा परवाना हरवल्याचे म्हटले होते. पण आता सलमान खानला न्यायालयाने प्रकरणातही दिलासा दिला आहे. सलमानचा खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करावे हा हेतू नसल्याचा दावाही त्याच्या वकिलांनी केला आहे.

१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान खान जोधपूरला गेला होता. त्यावेळी सलमान खानवर काळवीट शिकार प्रकरणात तीन आणि आर्म्स अॅक्ट प्रकरणात एक गुन्हा दाखल होता. सलमान खानला याआधीच आर्म्स अॅक्ट प्रकरणात दिलासा मिळाला आहे. आता त्याला आणखी एका प्रकरणात दिलासा देण्यात आला आहे.

सलमान खानला या सगळ्या खटल्याच्या दरम्यान त्याचा शस्त्र परवाना न्यायालयात जमा करायचा होता. पण हा परवाना हरवल्याचे प्रतिज्ञापत्र सलमान खानने न्यायालयात सादर केले होते. पण त्याचा शस्त्र परवाना हरवला नसून तो नुतनीकरणासाठी दिल्याची माहिती समोर आल्यामुळे २००६ मध्येच सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली होती. आता सलमान खानला या प्रकरणातही दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment