ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर मोहन भागवतांचे टीकास्त्र


नागपूर – सध्या पश्चिम बंगालची परिस्थिती शिमगा सरला तरी कवित्व जात नाही, अशी असून राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात एकमेकांच्याविरोधात असतात, पण काही लोक निवडणुकीनंतर देखील देशात अराजकता पसरवण्याचे काम करत आहेत. हे मानवतावादाविरोधात असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपावेळी व्यक्त केले आहे.

मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचे कौतुक केले होते. तसेच त्यांनी दिलेले जे आश्वासन पूर्ण केले नाही ते पूर्ण करण्याचा सल्लाही त्यांनी मोदींना दिला, तर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडत राजकीय पक्षांना इशाराही दिला.

ही लोक अतिशय शहाणे आहेत. कोण काय करते हे त्यांना कळते. सत्तेचा माज जे करतात लोक त्यांना नाकारतात हे पश्चिम बंगालमध्ये दिसून आले आहे. ७५२ ठिकाणांहून आलेल्या ८४८ विद्यार्थ्यांनी संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षेकरता सहभाग नोंदवला होता.

Leave a Comment