जिओला सहकार्य न केल्यामुळे एअरटेल, व्होडाफोन-आयडियाला 3050 कोटींचा दंड


नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना दूरसंचार विभागाने जबर दंड ठोठावला असून दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओला कॉल कनेक्ट करण्यास एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने टाळाटाळ चालविल्यामुळे 3,050 कोटींचा दंड या कंपन्यांना केला आहे.

सध्या नुकसानीचा सामना टेलिकॉम कंपन्यांना करावा लागत असल्यामुळे डिजिटल कम्युनिकेशन्स कमीशनने या दंडाबाबत ट्रायकडे मत मागितले आहे. रिलायन्स जिओवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यास कमीशनने नकार दिला आहे. जिओ चांगली सेवा देण्यास अपयशी ठरली आहे. दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यानुसार भारती एअरटेल आणि व्होडाफोनआयडिया यांनी रिलायन्स जिओला इंटरकनेक्शन न दिल्याने डीसीसीने हा दंड ठोठावला आहे.

रिलायन्स जिओने दाखल केलेल्या याचिकेमध्ये ऑक्टोबर 2016 मध्ये तीन कंपन्यांना प्राधिकरणाने 3050 कोटींचा दंड ठोठावला होता. ट्रायने एअरटेल आणि व्होडाफोनवर प्रत्येकी 1050 रुपयांचा दंड ठोठावला होता. तर आयडियावर 950 कोटी रुपयांचा दंड आकारला होता. आता व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आल्या आहेत.

Leave a Comment