अन्यथा शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची भाषा बोलणे बंद करा


सोलापूर – खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना सध्या आरक्षण या प्रश्नाचे राजकारण होत असून त्यामुळे जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम होते. तसेच या देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सर्वांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, अन्यथा सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी मागणी

त्याचबरोबर त्यांनी यावेळी राजकीय स्वार्थांसाठी जातींचा आधार घेतला जात असल्याची टीकाही केली. कोणताही पक्ष जातीचे राजकारण करण्यात अपवाद नाही. एकाच माळेचे सर्वजण मणी आहेत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे नाहीतर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा गर्भित इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.

मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम यांच्यातील मागास घटकांचे आरक्षण प्रलंबित आहे. ते सर्वात आधी द्या, अन्यथा शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची भाषा बोलणे बंद करा, असे सांगतानाच यातून सामाजिक स्वास्थ बिघडवण्यापेक्षा ठोस निर्णय घ्यावे लागतील, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Comment