सध्या बॉक्स ऑफिसवर सलमान खान, कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘भारत’ हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. अद्यापही हा बहुचर्चित चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. ‘भारत’ची कमाई १५० कोटी रुपयांहून अधिक देशात झाली आहे तर या चित्रपटाने जगभरात कमाईचा २५० कोटींचा टप्पा गाठला आहे.
'Bharat' takes the world by Storm by recording a Gross Worldwide Box-Office Collection of 250 Crores and counting…#BharatCrosses250Crores
@BeingSalmanKhan @aliabbaszafar @itsBhushanKumar #KatrinaKaif #Tabu @bindasbhidu @nikhilnamit @reellifeprodn @SKFilmsOfficial @tseries pic.twitter.com/kVXYO3Tz17— Atul Agnihotri (@atulreellife) June 11, 2019
सोशल मीडियावर ही माहिती कतरिना कैफ व अतुल अग्निहोत्री यांनी दिली. चित्रपटाने जगभरात २५० कोटी रुपयांची कमाई केली असून अजूनही हा आकडा वाढणार असल्याचे ट्विट अतुल अग्निहोत्रीने केले आहे. आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कतरिनानेही सलमानचा फोटो ठेवला आहे.