विश्वचषक स्पर्धेतून बाहेर टीम इंडियाचा गब्बर बाहेर


लंडन – भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर शिखर धवन तब्बल तीन आठवड्यांसाठी भारतीय संघातून बाहेर पडला आहे.

भारताने लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ३६ धावांनी विजय मिळवला होता. शिखर धवनने या सामन्यात 109 चेंडूत 117 धावाची शानदार शतकी खेळी केली होती. शिखरच्या डाव्या अंगठ्याला या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याला त्यामुळे आता विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

झालेल्या या दुखापतीमुळे शिखर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता. त्याच्याजागी पूर्ण डावात रविंद्र जडेजाने क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली होती. भारतीय संघाचा विश्वचषकातील पुढील सामना 13 जूनला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात शिखरच्याजागी आता कोणत्या खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळते हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.

Leave a Comment