दहावेळा अयोध्येत उद्धव ठाकरे गेले तरी राममंदिर बांधणे अशक्य


नवी दिल्ली : आपल्या विजयी 18 खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते तेथे राम जन्मभुमीला भेट देणार आहेत. आधी मंदिर मग सरकार असा आवाज निवडणुकीआधी शिवसेनेने दिला होता. या पार्श्वभुमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 10 वेळा जरी अयोध्येला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गेले तरी राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालय निर्णय येत नाही, तोपर्यंत राममंदिराचा प्रश्न सुटणार नसल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केल आहे.

यापूर्वी देखील उद्धव ठाकरे अयोध्याला गेले होते पुन्हा पुन्हा अयोध्येत जाण्याची गरज नसल्याचे वक्तव्यही आठवलेंनी केले आहे. कायदेशीर मार्गाने राममंदिर हे बांधले जावे असेही ते म्हणाले. त्यांनी यावेळी राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराविषयी देखील भाष्य केले. राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे त्यावेळी एक मंत्रीपद आरपीआय पक्षाला मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राम मूर्ती अयोध्येत लावणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली असल्यामुळे राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अयोध्या शोध संस्थानातर्फे या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. काष्ठ कला दुर्मिळ मूर्तीची स्थापना अयोध्येच्या शोध संस्थान शिल्प संग्रहालयात करण्यात येणार आहे. ही मूर्ती पुढच्या काळात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरणार आहे. कावेरी कर्नाटक स्टेट आर्ट एंड क्राफ्ट एंपोरियम येथून ही मूर्ती खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 35 लाख एवढी किंमत मोजण्यात आली आहे. 2017 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने या मूर्तीला सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment