आता पण प्रकाश मेहतांची पाठराखण करणार का मुख्यमंत्री ? – जयंत पाटील


मुंबई – निःपक्षपाती फडणवीस मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची मेहतांच्या चौकशीसारखी चौकशी होणार का? आणि मुख्यमंत्री दोषी आढळल्यानंतर आता तरी भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. प्रकाश मेहता एसआरए घोटाळ्यात दोषी असल्याचा अहवाल लोकायुक्तांनी दिला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यावर बोलताना हा प्रश्न केले आहे.

चौकशी आधीच मेहतांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली होती. पण सत्य आता चौकशीमुळे समोर आले आहे. वारंवार विधानसभेत एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली असल्याचेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अखेर चौकशीचे आदेश दिले. चौकशीनंतर आता घोटाळा उघडकीस आला, असेही आमदार जयंत पाटील म्हणाले. आता तरी भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Leave a Comment