भाईजानच्या ‘भारत’ची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी लयलूट


ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांचा भाईजानच्या या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर भारत चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४२.३० कोटींची कमाई केली आहे.

सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाने याआधी पहिल्याच दिवशी ४०.३५ कोटींची कमाई केली होती. प्रेम रतन धन पायो चित्रपटातचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ‘भारत’ने पहिल्याच दिवशी मोडले आहेत. बुधवारी झालेल्या भारत आणि आफ्रिकेच्या मॅचचाही चित्रपटाला फारसा फटका बसलेला दिसत नाही.

भाईजान नेहमीप्रमाणेच आपल्या चाहत्यांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यात यावेळीही यशस्वी ठरला आहे. पहिल्या दिवशीची ही कमाई पाहता हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार करेल, यात काही शंका नाही. अशात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी कोणते नवे रेकॉर्ड बनवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment