काही भाजप समर्थक पसरवत आहेत द्वेषाची भावना – ममता बॅनर्जी


कोलकाता – फेसबूकच्या माध्यमातून भाजपवर टीका करताना पोस्टद्वारे ममता बॅनर्जी यांनी लिहिले आहे, की हिंदू धर्माचे वाक्य जय श्रीरामचा वापर भाजपचे नेते चुकीच्या पद्धतीने करत आहेत. खोटी माध्यमे, खोटे व्हिडिओ, खोट्या बातम्या, चुकीची माहिती याद्वारे काही भाजप समर्थक द्वेषाची भावना पसरवत असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असून ते खरी माहिती लपवत आहेत.

बंगालला राम मनोहर रॉय ते विद्यासागर तसेच अनेक महान सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे महान वारसा लाभला आहे. भाजप प्रगती आणि पुरोगामी विचारधारा असणाऱ्या बंगालला चुकीच्या पद्धतीने आणि नकारात्मक दृष्टीने मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.

कोणत्याही पक्षाच्या घोषवाक्याबद्दल मला तक्रार नाही. स्वत:चे असे प्रत्येक पक्षाचे घोषवाक्य आहे. जय हिंद, वंदे वातरम असे माझ्या पक्षाचे घोषवाक्य आहे. इंकलाब जिंदाबाद असे डाव्याचे आहे. इतरांचे वेगवेगळे घोषवाक्य आहे. एकमेकांचा आम्ही आदर करतो. जय सिया राम, जय राम जी की, राम नाम सत्य है ही धर्माशी निगडीत असलेली घोषवाक्य आहेत. आम्ही याचाही आदर करतो. पण जय श्रीरामचा वापर भाजप राजकारणासाठी चुकीच्या पद्धतीने करत आहे. भाजपचा आरएसएसच्या नावाखाली सुरु असलेले हा प्रकार आम्ही याचा कदापिही स्वीकार करणार नाही. एकजण काहीवेळा काहीजणांना फसवू शकतो परंतु, तो सर्वांना फसवू शकत नाही, असेही ममतांनी भाजपवर टीका करताना लिहिले आहे.

Leave a Comment