राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनकरणाचा निर्णय परस्पर घेता येणार नाही – उदयनराजे


अहमदनगर – दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाल्यापासून काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. पण ही शक्यता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फेटाळून लावली आहे. त्याचप्रमाणे उदयनराजे यांना याबाबत विचारले असता आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आमच्याशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय कसा करता येईल? असा प्रतिप्रश्न उदयनराजे यांनी विचारला आहे. पक्षाचे विलीनीकरण राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि खासदार चर्चा केल्याशिवाय कसे करता येईल हा प्रश्न उदयनराजेंनी विचारला.

उदयनराजे अहमदनगरमधील चौंडी या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. उदयनराजेंनी येथे आयोजित जयंतीच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांना यावेळी विलीनीकरणाबाबत विचारले असता आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी दिली. असा कोणताही निर्णय आम्हा सगळ्यांशी चर्चा केल्याशिवाय कसा घेतला जाईल? असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला आहे. परस्पर निर्णय घेता येणार नाही. विलीनकरण का करायचे आहे हे आम्हाला सांगितले गेले पाहिजे. विलीनकरण करण्याचे ठरवले तर कोणत्या पक्षात करायचे हेदेखील पक्षातील सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन ठरवले गेले पाहिजे असेही उदयनराजेंनी म्हटले आहे.

Leave a Comment