एकही उमेदवार निवडूण न येणाऱ्या आठवलेंना कसे मिळाले मंत्रिपद ?


नवी दिल्ली : काल पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिपदाची त्यांच्या 57 सहकारी मंत्र्यांनीही शपथ घेतली. महाराष्ट्रातील सात जणांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांचा यात समावेश आहे. लोकसभेची एकही जागा रामदास आठवले यांनी लढवली नव्हती, तरीही त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले. पण एका वृत्त मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास आठवले यांनी एकही उमेदवार निवडूण आले नसतानाही केंद्रात मंत्रिपद कसे मिळाले, याचे गुपित उलगडले आहे.

दुसऱ्यांना मंत्रिपद मिळण्याचे गुपित म्हणजे नरेंद्र मोदींच्या प्रत्येक सभेला मी उपस्थित होतो. मोदी म्हणायचे की, फडणवीस तुमच्यावर खुश आहेत आणि फडणवीस म्हणायचे की, मोदी तुमच्यावर खुश आहेत. मी म्हणायचो तुम्ही दोघे खुश तर मीही खुश असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, मंत्रिपद मिळावे म्हणून यंदा मी कुणाला भेटलो नाही, सहज मिळाले, असेही सांगायला आठवले विसरले नाहीत.

दुसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाला संधी मिळाली. मी आनंदी आहेच. माझे कार्यकर्तेही त्याचप्रमाणे आनंदी आहेत. आनंद आता साजरा करुन चालणार नाही. जे खाते मिळेल त्याचे सोने करणार आहे. सामजिक ऐक्य निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याचे यावेळी रामदास आठवेल म्हणाले. पण, कोणते खाते द्यायचे, तो अधिकार पंतप्रधानांचा आहे. जी जबाबदारी माझ्यावर ते सोपवतील ती पार पाडेन. माझा मंत्रिपदाचा अनुभव त्यामुळे दुसऱ्यांदा संधी मिळाली, असेही आठवले म्हणाले.

Leave a Comment