जे हरणार होते त्यांचाच मी प्रचार केला – स्वरा भास्कर


मुंबई : 17व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएने भरघोस विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात कलाविश्वातील अनेक कलाकार उतरले होते. भाजप विरोधी पक्षांच्या उमेदवारांसाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने प्रचार केला होता. जितक्या उमेदवारांसाठी स्वरा भास्करने प्रचार केला होता त्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.

तिने प्रचार केलेल्या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर एक ट्विट स्वरा भास्करने केले आहे. अशा सर्व उमेदवारांसाठी मी प्रचार केला, जे पराभूत होतील याची मला पूर्वीपासून कल्पना होती. पण आपल्या लोकशाही, आपल्या संविधानाच्या मूल्यांचा हे उमेदवार आदर करतात, ते देशातील तिरस्काराविरुद्ध लढा देतात आणि काहीही झाले तरी या मूल्यांचे महत्त्व कधीच कमी होणार नसल्याचे स्वराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्वराने प्रचार केलेल्यांमध्ये कन्हैया कुमार याचा चार लाख मतांनी, आपच्या अतिशी मर्लेना यांचा तीन लाख मतांनी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा दोन लाख मतांनी, अमरा राम यांचा सात लाख मतांनी, राघव चड्डा यांचा लाख मतांनी तर दिलीप पांड्ये यांचा ५ लाख मतांनी पराभव झाला आहे.

स्वरा भास्करला लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात करण्यात आले. एका यूजर्सने भाजपच्या विजयानंतर स्वराच्या ट्विटरवर अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. स्वरा अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरुन चर्चेत असते. तिला तिच्या विधानांमुळे सोशल मीडियावर ट्रोलही केले जाते.

Leave a Comment