भाजपचे काँग्रेसमुक्तीचे स्वप्न ‘या’ उमेदवारामुळे भंगले


मुंबई – भाजपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा दिला होता. पण त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. भाजपचे हे स्वप्न चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर हे विजयी झाल्याने भंगले आहे. धानोरकर हे केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत जायंट किलर ठरले.

राज्यात काँग्रेसला एकमेव जागा जिंकता आली आहे. भाजपने निवडणुकीदरम्यान काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा दिला होता. पण भाजपचा नारा बाळू धानोरकरांनी यशस्वी होऊ दिला नाही. राज्यात युती ४५ जागा जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला होता. पण यावेळी युतीला ४१ जागा जिंकता आल्या. यामध्ये भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या. निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर वगळता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपासून ते सुशीलकुमार शिंदेंपर्यंत सगळ्यानांच पराभवाला सामोरे जावे लागले.

Leave a Comment