मतदानानंतर मतदान करण्याचा सल्ला देणार फरहान अख्तर ट्रोल


लोकसभा निवडणुकांची चर्चा सध्या देशभरात सुरू असून या निवडणुकीचे सहा टप्पे याआधीच पार पडले होते. त्यानंतर काल (१९ मे) शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. कलाविश्वातील अनेक कलाकारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. पण निवडणुका पार पडल्यानंतर मतदान करण्याचे आवाहन केल्याने फरहान अख्तर सोशल मीडियावर ट्रोल झाला.

काल सकाळी लोकसभा निवडणुकी संदर्भात फरहानने ट्विट केले होते. त्याने या ट्विटमध्ये भोपाळच्या मतदारांना मतदान करण्यास सांगितले होते. पण १२ मे रोजीच भोपाळ मतदार संघाचे मतदान पार पडले होते. फरहानने वास्तविकतेचा विचार न करता भोपाळच्या मतदारांना मतदान करण्यास सांगितले. तसेच त्याने आपल्या ट्विटच्या माध्यमातून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना मत न देण्याचे आवाहनही केले होते. त्याला यावरूनही ट्रोल करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीचे किती महत्व फरहानला आहे हे यावरुन दिसते, फरहानचे डोके ठिकाणावर आहे का?, भोपाळचे मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा फरहान पहिले पाहा, अशा अनेक प्रतिक्रिया त्याच्या ट्विटनंतर आल्या होत्या. फरहानने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यानंतर पुन्हा एक ट्विट करत सोशल मीडियावर उत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे, की एका तारखेचा चुकीचा उल्लेख मी केला तर माझा गळा पकडत आहात. पण इतिहासालाच ज्याने चुकीचे मानले, त्याची गळाभेट घेत आहात, असे ट्विट त्याने केले आहे.

Leave a Comment