चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवासाठी १६६ विशेष रेल्वे गाड्या


मुंबई – गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा, यासाठी तब्बल १६६ विशेष मेल, एक्सप्रेस मध्य रेल्वेकडून चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील या गाड्या सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत धावणार आहेत.

२८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत मुंबई ते सावंतवाडी दरम्यान २६ फेऱ्या चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०१००१ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेस मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून सुटेल. ही मेल, एक्स्प्रेस सावंतवाडीला दुपारी २ वाजून १० मिनिटाला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१००२ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सावंतवाडीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१००७ मुंबई ते सावंतवाडी मेल, एक्स्प्रेसच्या १२ फेऱ्या चालविण्यात येतील. २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी ती रात्री १२.२० ला सुटेल. गाडी क्रमांक ०१००८ सावंतवाडी ते मुंबई मेल, एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता सुटेल.

गाडी क्रमांक ०१०३३ मुंबई-रत्नागिरी-पनवेल २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत ३२ फेऱ्या चालविण्यात येतील. ती सीएसएमटीहून सकाळी ११.३० वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक ०१०३४ रत्नागिरीहून रात्री १०.५० वाजता सुटेल. याचप्रमाणे पनवेल-सावंतवाडी-मुंबई २२ फेऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेडणे ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप ६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल ८ फेऱ्या, पनवेल-सावंतवाडी ८ फेऱ्या, पनवेल-थिवीम आणि पुणे-रत्नागिरी ६ फेऱ्या (व्हाया कर्जत-पनवेल) तसेच पुणे-करमळी २ फेऱ्या चालविण्यात येतील.

Leave a Comment