मायावतींना रामदास आठवले यांचा लग्न करण्याचा सल्ला


वाराणसी : लोकसभा निवडणुकीचा प्रचार देशात सध्या जोरात सुरू आहे. राजकीय मैदाने आरोप – प्रत्यारोपांनी गाजताना दिसत आहे. वैयक्तिक टीका – टीपण्णी करताना अनेक नेते देखील दिसत आहेत. बसपा प्रमुख मायावती यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून मोदींवर निशाणा साधला होता. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या या विधानाला वाराणसीमधील पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची चिंता मायावती यांनी करू नये. त्यांनी स्वत: लग्न करावे, असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी मायावतींना दिले आहे. त्यांनी सपा – बसपावर यावेळी देखील टीका केली.

तर, पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी बसतील अशा शब्दात रामदास आठवले यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. सातव्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणूक 2019मध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल. एनडीएचे सरकार बनेल असा विश्वास योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, बाबा रामदेव यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे देखील म्हटले आहे. त्यांनी यावेळी विरोधीपक्षांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. 23 मे रोजी माझ्या भविष्यवाणीने देशातील काही राजकारण्यांचे स्वास्थ बिगडेल. त्यांना टेन्शन येईल. शिवाय, त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडेल असे देखील बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. बाबा रामदेव यांनी गुरूवारी हरिद्वार येथील कार्यक्रमात बोलत असताना सरकार एनडीएचे बनेल असा विश्वास व्यक्त केला. देशाला मजबूत आणि स्थिर सरकार मिळेल अशी आशा देखील यावेळी बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. यावेळी बाबा रामदेव यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले.

Leave a Comment