आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर नाही – ममता बॅनर्जी


दक्षिण परगणा – पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हस्तक्षेप करत असून हे सर्व आम्ही शांतपणे पहात आहोत. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असा होत नाही, असा इशारा मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला.

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी दक्षिण २४ परगणा येथील एका सभेत बोलत होत्या. माझा आणि बंगालचा अपमान तुम्ही केला आहात. बंगालमधील सरकारही मला तुम्ही चालवू देत नसल्याचे ममता म्हणाल्या.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात वाकयुध्द सुरु आहे. ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीही मोदींवर टीका केली होती. मोदी यांची छाती ५६ इंच आहे, त्यांना मारल्यास माझा हात तुटेल असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी बसीरहाट येथील एका सभेत केले होते. बंगालमध्ये मोदी हे आल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर पैसे खाण्याचा (तोलबाज) आरोप केला होता. त्यावर बोलताना ममता बॅनर्जी यांनी मोदींना लोकशाहीची थप्पड’ मारायची आहे, असे वक्तव्य केले होते.

Leave a Comment