विश्वास नांगरे पाटलांनी नाशिक शहरात लागू केली हेल्मेटसक्ती


नाशिक – गेल्या आठवड्यात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहर परिसरात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीचा करणार असल्याच्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यानुसार आजपासून नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ही हेल्मेटसक्ती १३ मे म्हणजे आजपासून अंमलात आली असून वाहतूक पोलीस शहरातील चौकाचौकात नियमाची काटेकोरपणे अंमलबाजवणी करत आहेत. हेल्मेट सक्तीसह बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी विशेष मोहीम नाशिक पोलिसांनी हाती घेतली आहे.

अपघाताच्या संख्येत शहरात वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे वाढ होत आहे. एप्रिलपर्यंत रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला, ८८ गंभीर तसेच ३१ किरकोळ अपघातात १८३ जण जखमी झाले. यंदा मागील वर्षांच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण काही अंशी कमी असले तरी शहर वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस ते नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, विनासीटबेल्ट चारचाकी चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी कारणे अपघाताच्या मागे समोर येतात. दुचाकी अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यात ३५ चालकांनी हेल्मेट घातलेले नव्हते. चारचाकी चालकांचा अपघातात मृत्यू झाला. एकानेही सीटबेल्ट लावलेला नव्हता. चुकीच्या दिशेने गाडी नेल्याने अपघात झाले आहेत. याशिवाय अल्पवयीन वाहनचालक आणि त्यांच्या पालकांवरही मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्याचे नियोजन आहे.

Leave a Comment